पुणे प्रतिनिधी : ‘गो बॅक अदानी’च्या कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध नोंदविला. तर या आंदोलनामुळे पुणे शहरातील अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसल्याचे पाहावयास मिळत आहे..आणि त्याचबरोबर पुण्याच्या काही ग्रामीण भागात सुद्धा काही तास वीज पुरवठा खंडित करून सरकारच्या धोरणाच्या विरोधात आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आलेला आहे..
सिंहगड परिसरातील धायरी, आनंदनगर, सनसिटी परिसरात पहाटे साडेतीनपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच कात्रज, टिंगरे नगर, विश्रांतवाडी, कसबा पेठ परिसरात सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.आज पासून राज्यातील वीज कर्मचारी खासगीकरणाच्या निषेधार्थ आजपासून ७२ तासाच्या आंदोलनावर ठाम आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक महावितरण कार्यालयांबाहेर आंदोलन करण्यात येत असून, पुण्यातील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयाबाहेर हजारो वीज कर्मचारी एकत्रित येऊन आंदोलन करीत आहे.
आमचा खासगीकरणाला पूर्णपणे विरोध असल्याने आंदोलनाचा अस्त्र उगारला. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे.असे संघटनेचे पदाधिकारी भीमाशंकर पोहेकर म्हणाले आहे,
अन्यथा यापुढे आम्ही 18 तारखेपासून बेमुदत तीव्र आंदोलन करणार आहे, असा इशारा यावेळी वीज कर्मचाऱ्यांनी दिला आहे..!!