अहमदनगर प्रतिनिधी:- आज अहमदनगर येथे पुरोगामी विचाराचे वैचारिक वारसदार राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष ॲड. प्रमोद दादा सरोदे यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड युवा मंच, अहमदनगर जिल्ह्याची आढावा बैठक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मुबीन मुल्ला (आष्टेकर) यांच्या उपस्थितीत पार पडली.
आदरणीय आव्हाड साहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा जिल्ह्यातील कानाकोपर्यात पोहोचवला पाहिजे यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले शिवाय शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा तळागाळात पोहोचला पाहिजे त्यासाठी विविध मार्गातून जनजागृती करण्यासाठी तसेच प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता सक्षम करण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष प्रमोद दादा सरोदे यांच्यावतीने दिले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा सरचिटणीस महेश भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख, महिला जिल्हाध्यक्षा गौतमी ताई भिंगारदिवे, जिल्हा उपाध्यक्ष सुनीता ताई धनवटे, तालुका उपाध्यक्ष सीताराम सकट, तालुका कार्याध्यक्ष शेखर पंचमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक, संपतराव कांबळे,अशोक धनवटे साहेब, तोफिक पटेल, नयन ताई खांडरे, रुपालि ताई शेलार आदी उपस्थित होते.
जयसिंगपूर शहर व परिसरात होणाऱ्या प्रदूषणावर तात्काळ कारवाई करा अन्यथा उपोषण – मुबीन मुल्ला आष्टेकर
जयसिंगपूर प्रतिनिधी:- आज शिरोळ येथे तहसील कार्यालयात नायब तहसीलदार श्री योगेश जमदाडे साहेब यांना राष्ट्रवादी विद्यार्थी चे प्रदेश संघटक मुबीन...