बीड प्रतिनिधी :- सध्याच्या युगात मुल जन्माले की त्यांचे ओळखपत्र म्हणून आधार क्रमांक हे आहे. लहानापासून ते प्रौढांपर्यंत सर्वांनाच ते ओळखपत्र जतन व वेळोवेळी त्याचे अपडेट करावे लागते. मात्र कधी दुसऱ्याच्या चुकीमुळे आपली ओळखच पुसली गेली तर नेमकं काय करावे. असच काही घडलंय मांजरसुभा येथील 11 वी पास विद्यार्थ्याबरोबर घडले काही महिन्यांपूर्वी त्याने अपडेट करण्यासाठी आधार सेवा केंद्रात गेला असता त्यांचे आधार कार्ड ही अपडेट झाले होते.मात्र काही दिवसांनी ते आधार कार्ड कँन्सल झाले.हे कश्याने घडलं आधार कार्ड का? कँन्सल करण्यात आले असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र त्याचे आजतागायत निरसन करण्यात आले नाही. तो आज अनेक ठिकाणी ते आधार कार्ड घेऊन फिरत आहे अनेक वेळा पुन्हा ते आधार क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही.यामध्ये त्याचे मूल्यवान वेळ व आर्थिक नुकसान होत आहे. तर नेमकं आधार कार्ड नवीन काढावे का? तर आत्तापर्यंत शिक्षणात विविध ठिकाणी ते आधार क्रमांक जोडण्यात आले होते त्यांचे काय होईल असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मात्र कोणताही आधार सेवा केंद्र धारक योग्य मार्गदर्शन करू शकला नाही. असे अनेक प्रकार घडत असून आधार सेवा केंद्र धारकांच्या चुकीच्या पद्धतीने माहिती भरल्याने घडत असल्याचे समोर येत आहे. याची शिक्षा आता या विद्यार्थ्यांना भोगावी लागत असून अश्या चुकीच्या काम करणाऱ्या आधार सेवा केंद्र धारकांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यीं व पालकांच्या वतीने करण्यात येत आहे..
जयसिंगपूर शहर व परिसरात होणाऱ्या प्रदूषणावर तात्काळ कारवाई करा अन्यथा उपोषण – मुबीन मुल्ला आष्टेकर
जयसिंगपूर प्रतिनिधी:- आज शिरोळ येथे तहसील कार्यालयात नायब तहसीलदार श्री योगेश जमदाडे साहेब यांना राष्ट्रवादी विद्यार्थी चे प्रदेश संघटक मुबीन...