जयसिंगपूर प्रतिनिधी :- आज जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक मुबीन मुल्ला-आष्टेकर यांनी जयसिंगपूर शहरात नो पार्किंग मध्ये असणाऱ्या गाड्यावर दंडात्मक कारवाई करू नये यासाठी जनजागृती करावी याबाबत निवेदन देण्यात आले जयसिंगपूर शहर हे राजर्षी शाहू महाराजांनी एक मोठी अखीव रेखीव बाजारपेठ म्हणून जयसिंगपूर शहराची स्थापना केली.
या शहराची लोकसंख्या व व्यापार वाढला आहे याचमुळे शहरात पार्किंगसाठी कोणतेही पांढरे पट्टे मारले नाहीत शिवाय याचे फलक ही लावलेले नाहीत त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे नाहक गाड्यांवर नो पार्किंगची दंडात्मक कारवाई केली जाते शहरात असणाऱ्या बोळांमध्ये सुद्धा या गाड्या उचलल्या जातात त्यामुळे नागरिकांना त्रास होतो त्यामुळे पोलीस प्रशासनाने याबाबत फलक लावून पार्किंग साठी बोर्ड लावावेत याचे निवेदन देण्यात आले यावेळी माझ्यासमवेत भारतीय काँग्रेस पक्षाचे आफरीद नदाफ, स्वराज्य जनक्रांती आंदोलनाचे कैलास काळे, आरोग्य हक्क समितीचे सुरज पवार उपस्थित होते.