आंध्रप्रदेश:- प्रदेशातील जुने धरण: आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्हा प्रशासनाने रविवारी संध्याकाळी सार्वजनिक सुचना जारी केली आहे. आणि रामचंद्र मंडल येथे 14 किमी अंतरावर असलेल्या ‘रायलचेरुवू’ नावाच्या 500 वर्षे जुन्या जलाशयाच्या धरणामुळे लोकांना 16 गावे तात्काळ रिकामी करण्यास प्रशासनाने सांगितले आहे.
रायलचेरुवू’ नावाच्या 500 वर्षे जुन्या धरणाला
काही भेगा पडल्या आहेत..!!अधिकाऱ्यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या अति पावसामुळे सर्वात जुना जलाशय आता प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला असून किरकोळ भेगा पडू लागल्या आहेत. विशेष अधिकारी पीएस प्रद्युम्न, चित्तूरचे जिल्हाधिकारी एम हरिनारायणन, तिरुपतीचे पोलीस अधीक्षक व्यंकट अप्पाला नायडू यांच्यासह महसूल आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांनी जलाशयाला भेट दिली आणि कोणताही धोका टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सध्या कोणताही धोका नाही, असे ते म्हणाले की, सध्या जलाशयाला कोणताही धोका नाही, तरी खबरदारी म्हणून गावकऱ्यांनी तातडीने तीन दिवस गावे रिकामी करावीत. ते म्हणाले की, गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी तयार केलेल्या मौल्यवान वस्तूंसह उंच भागात किंवा जवळच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात जावे.
शरद पवारांचे विश्वासू अॅड. उदय शेळके यांचे निधन.
अहमदनगर प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात...