नवी दिल्ली:- केंद्रीय मंत्रीमंडळानं आज केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा तात्काळ निर्णय घेतला आहे . यामुळे सध्या महागाईचा भत्त्यात ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे . यंदाच्या जुलैपासून ही वाढ लागू होणार आहे . केंद्र सरकारमध्ये कार्यरत असलेले ४७ लाखाहून अधिक अधिकारी – कर्मचारी आणि साडे ६८ लाखांहून अधिक निवृत्ती वेतनधारकांना यांना लाभ होईल , अशी हि माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे . केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याला मान्यता दिली आहे . १३ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा आराखडा प्रसिद्ध केला होता . याअंतर्गत कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली १८ मंत्रालयं आणि विभागांच्या सचिवांची एक समिती सध्या तयार करण्यात आली आहे . दळणवळण दैनिंदिन परिणामकारकरित्या व्हावे , यासाठी पीएम गतिशक्तीचा काटेकोर आढावा घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे . विविध मंत्रालयांच्या घडामोडी एकमेकांशी निगडीत असाव्यात यासाठी प्रक्रिया ठरविण्याची जबाबदारीही यांच्यावर आहे .
शरद पवारांचे विश्वासू अॅड. उदय शेळके यांचे निधन.
अहमदनगर प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात...